वाढती महागाई, भ्रष्टाचार, अच्छे दिनचा पडलेला विसर या शब्दांनी
वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरत असले तरी माझ्या सारख्या ज्योतिषाचे तरी
असे मत झाले आहे कि विवाहयोगा इतका दुसरा कुठलाच मोठा प्रश्न माणसाच्या
जीवनात असु शकत नाही. हे असे वाटण्याचे कारण म्हणजे सातत्याने याच
विषयासंदर्भात भेटणारे जातक. म्हणजे आज आमच्याकडे येणाऱ्या जातकांच्या
प्रश्नांचे वर्गीकरण केले असता निम्म्याहुन अधिक प्रमाणात जातक विवाहयोग
विचारण्यासाठीच येत असतात. आणि म्हणुन माझे एक मत बनले आहे कि बाकी काही
म्हणो सध्यातरी विवाहयोग हाच महत्वाचा प्रश्न आहे.
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com
पण त्याचवेळी हा
हि विचार मनात येतो कि हे असे का? इतर जटिल प्रश्न समोर असताना हाच प्रश्न
इतका महत्वाचा का? याच्या उत्तराचा विचार करताना दोन पिढ्यांमधील अंतराचा
आपण विचार केला पाहिजे. आत्ता विवाहयोग्य असलेल्या मुलामुलींचे पालक ज्या
पिढीतले आहेत त्या पिढीत २१ व्य वर्षी लग्न तर २५ व्या वर्षी पदरी दोन मुल
अशी सामाजिक पद्धती होती. पदवी पर्यंतचे शिक्षण हीच खुप मोठी बाब होती आणि
तेवढ्या शिक्षणावरही सहज नोकरी मिळत होती. नोकरी आली कि छोकरीही निश्चित
होती. काही अपवाद वगळता सर्वसाधारण गणित हे असेच होते. सध्या मात्र
परिस्थिती वेगळी आहे. सर्वत्र स्पर्धा इतकी वाढली आहे कि कितीही शिक्षण
घेतले तरी ते अपुरेच वाटते. यामुळे शिक्षणाचे वय २५ ते अगदी ३० पर्यंत जाऊन
पोहचले आहे. त्या पुढे किमान दोन वर्ष करिअर आणि मग लग्न. या अर्थाने
बहुतांशी लग्नाचे वय हे कमीत कमी २६ पर्यंत पुढे आले आहे. आणि हे २१ ते २६
मधलं पाच वर्षाचं अंतर पालकांना अधिक चिंतेत टाकत. आणि हे अंतर जसं जस वाढत
जात तस तास हा प्रश्न ऐरणीवर येऊ लागतो. आणि मग मी वर म्हणल्या प्रमाणे
याच्या इतका दुसरा कुठलाच महत्वाचा प्रश्न जातकाच्या आयुष्यात राहात नाही.
मग जातक पालक असोत कि स्वतः मुलगा/मुलगी.
मग या प्रश्नातुन बाहेर
पडण्याचा मार्ग काय? आपण आपल्या मुलाची/मुलीची कुंडली अधिकारी ज्योतिषाकडे
दाखविणे. त्यांच्याकडुन विवाहाचे योग जाणुन घेणे. आणि योग्य वेळी
विवाहासाठी प्रयत्न सुरु करणे. काय आहे कि स्टेशनवर येणाऱ्या गाडीची वेळ
असते. जो दोन तास आधी येऊन थांबतो, त्याला ती दोन तासाने आली असे वाटते. तर
एखादा ऐनवेळी येतो, अगदी चालत्या गाडीत चढतो. त्याला वाटत आपण आलो आणि
लगेच गाडी मिळाली. आपल्याला एवढं ऐनवेळी जरी जायचं नसलं तरी गाडी स्टेशनवर
यायची वेळ आणि आपण स्टेशनवर जायची वेळ यात योग्य अंतर असेल तर हे मधले अंतर
निश्चितच तणावरहित व आनंदाचे असु शकते. आता हे मधले अंतर किती असावे याचा
निर्णय जरी ज्याचा त्यानी घ्यायचा असला तरी गाडीची वेळ मात्र आपण अधिकारी
ज्योतिषालाच विचारायला हवी.
या चिंतेमागे अजुन एक कारण दिसुन येते
ते म्हणजे या काळात विविध ज्योतिषांकडुन केला जाणारा विविध उपायांचा मारा.
हे सर्व उपाय यथाशक्ती (अनेकदा तर यथाशक्तीच्याही पुढे) करुन सुद्धा जेव्हा
विवाह योग जुळुन येत नाही तेव्हा चिंतेत अधिक भर पडते. उपायांच्या बाबतीत
एक मत माझे ठाम राहिलेले आहे कि, "An Astrologer can Read Your Future, He
cannot Change Your Future." एखाद्या उपायाने जर गाडी वेळेच्या आधी येणार
असती तर भारताने सुपरफास्ट इंजिन घेण्या ऐवजी प्रत्येक स्टेशनवर एक
ज्योतिषीच बसवला असता. पण असे होऊ शकत नाही. काही उपाय निश्चित माणसाला
मानसिकता बदलायला मदत करतात.ज्याचा उपयोग त्याला निर्णय प्रक्रियेमध्ये मदत
करतो. तसेच काही उपाय जातकाला ऊर्जा देणारेही असतात. या कारणास्तव एखादा
उपाय कोणी सांगत असेल तर तो जरुर करावा. मात्र एखाद्या उपायाने विवाहयोग
लवकर येईल असा दावा कोणी करु पाहात असेल तर त्यावर विश्वास ठेवु नये. यातुन
निराशाच पदरी पडते.
या सर्वाचा सार इतकाच विवाह योग हा
पूर्वनियोजित आहे. त्यामुळे त्या विषयी पालकांनी अथवा मुलांनी/मुलींनी
चिंता बाळगु नये. हा योग कधी आहे हे जाणुन घेतल्यास कदाचित विवाहापर्यंतचा
प्रवास अधिक सुखकर होऊ शकतो.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com
No comments:
Post a Comment