Saturday, 15 October 2016

गुणमेलन अधिक ग्रहमेलन

खरं तर हा विषय मी सातत्याने मांडत आलोय कि गुण मेलना इतकेच महत्व ग्रहमेलनालाही देणे गरजेचे आहे, पण काही ठिकाणी हा विषय टाळला जातो. आणि मग केलेले भाकीत चुकण्याची शक्यता निर्माण होते.

गुणमेलन हे चंद्र राशीवरुन केले जाते. चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे या पद्धतीतुन वधुवर स्वतःला सुयोग्य आहेत कि नाही हे ठरते. परंतु विशेषत्वाने सध्याच्या काळात जिथे स्त्री पुरुषांना स्वतंत्र निर्णय स्वातंत्र्य आहे, बहुतांशी अर्थार्जनाने स्वतंत्र आहेत तिथे फक्त मनाचा विचार न करता कुंडलीतील इतर स्थानांचा विचारही महत्वाचा ठरतो. आणि म्हणुनच चंद्रा इतकच इतर ग्रहांचे योग तपासणंही महत्वाचं ठरत.

विषय अधिक स्पष्ट करण्यासाठी सोबत एक उदाहरण देत आहे.


इथे पारंपरिक गुणमेलन पद्धती मध्ये २० गुण जुळतात, ज्या नियमाने पुढे जाण्यास हरकत नसावी.

ग्रहमेलनाचा विचार करता लग्न राशींचा नवपंचम योग आहे मात्र लग्नेश एकमेकांच्या केंद्रात आहेत. सप्तमेशांची प्रतियुती आहे. व दशमेश देखील प्रतियुती मध्ये आहेत.पंचमेश व कुटुंबेश लाभात तर चतुर्थेश नवपंचमात हीच काय जमेची बाजु आहे. रवि, मंगळ व शुक्र षडाष्टक योगात आहेत. चंद्र प्रतियुती तर गुरुचा एक राश्यांतर योग आहे. बुध नवपंचम तर शनि एका राशीत हीच काय ती जमेची बाजु आहे.

ग्रहमेलनाचा विचार करता मात्र हे स्थळ पुढे जाण्यास तितकेसे योग्य नाही.

आता आपण फक्त गुणमेलनाचा विचार करुन पुढे जा असे म्हणले असते तर ते तितकेसे योग्य ठरले नसते.
म्हणुनच विवाहासारखा महत्वाचा निर्णय घेताना, गुणमेलना बरोबरच ग्रहमेलनाचाही विचार केला गेला पाहिजे.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com

No comments:

Post a Comment